लोहगाव येथे लोहगाव-वाघोली समान पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन, तसेच धानोरी सर्वे क्र. ७ येथे बांधण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाकीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला जाणून घेऊ या विषयी सविस्तर माहीती.
लोहगाव येथे लोहगाव-वाघोली समान पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन, उपमूख्यमंञी अजित पवार यांच्या हस्ते संपन्न
लोहगाव येथे लोहगाव-वाघोली समान पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन, तसेच धानोरी सर्वे क्र. ७ येथे बांधण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाकीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम उपमूख्यमंञी अजित पवार यांच्या हस्ते पार पडला. 'Saman Pani Purwatha Yojana'
शहरा शेजारील गावात बेकायदेशीर बांधकामे, रस्त्यांचे प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे व्यवस्थित विकास होण्यासाठी महानगरपालिका, नगरपालिका असणे आवश्यक असून देहू, आळंदी, चाकण, राजगुरूनगर मिळून एक महानगरपालिका करता येईल का याबाबत विचार सुरू आहे, अशी माहिती यानिमित्ताने उपमूख्यमंञी तथा अर्थमंञी अजित पवार यांनी दिली.
लोहगावच्या समस्या सोडवण्यासाठी आवश्यक प्रयत्न करण्यात येतील
संरक्षण विभागाच्या हद्दीत असलेला रस्ता बाहेरुन काढून घेतल्यास येथील विमानतळाचं विस्तारीकरण करून मोठी आंतरराष्ट्रीय विमानं उतरू शकतील. कोणत्याही विकास प्रकल्पांना जागा आवश्यक असते.
जागेच्या मूल्यांकनाबाबत काही अडचणी असल्यास नोंदणी विभागाशी बोलून मार्ग काढण्यात येईल. लोहगावच्या समस्या सोडवण्यासाठी आवश्यक प्रयत्न करण्यात येतील. असे उपमूख्यमंञी अजित पवार पूढे बोलताना म्हणाले
पाणी बचत व्हावी म्हणून कालव्याऐवजी बोगदा करण्याचं नियोजन आहे उपमूख्यमंञी अजित पवार यांचे प्रतिपादन
पुण्याची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात रोजगाराच्या शोधात लोक येतात. त्यांना पाणी, आरोग्य, निवारा आदी सुविधा पुरवाव्या लागतात. त्यामुळे इंदापूर, हवेली, दौंड, पुरंदर तालुक्यातील शेतीला पाणी कमी पडत आहे.
पाणी बचत व्हावी म्हणून कालव्याऐवजी बोगदा करण्याचं नियोजन आहे. पुण्याच्या पाण्यासह, शेतीला पाणी मिळावं म्हणून टाटाच्या धरणातून पाणी मिळावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वापरलेले सांडपाणी प्रक्रिया करून शेतीला देण्यायोग्य करण्यासाठी आवश्यक तेथे एसटीपी उभारण्यात येतील, अशी पाण्याच्या नियोजना संदर्भातील माहीती उपमूख्यमंञी अजित पवार यांनी दिली.
नागरिकांना सुविधा देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीत भरीव वाढ केली आहे. Saman Pani Purwatha Yojana
लोहगाव येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी पीएमपीएमएलची बीआरटी लेन बंद केली. तसेच कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून उड्डाणपुलाची आवश्यकता आहे. रिंग रोड झाल्यानंतर हा प्रश्न बऱ्याच प्रमाणात सुटेल असे उपमूख्यमंञी यांनी सांगितले.
राज्य शासन नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील - उपमूख्यमंञी अजित पवार
राज्य शासन नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहे. राज्यात नोकरभरती मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे. त्यासोबतच ठिकठिकाणी रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून विविध आस्थापनांमध्ये युवांना रोजगार मिळावा म्हणून प्रयत्न सुरू आहेत.
राज्यात नवीन युवा धोरण बनवण्यात येणार आहे. आयटीआयमध्ये रोजगारक्षम नवीन अभ्यासक्रम सुरू केले आहेत, त्याचा युवकांना फायदा होईल. अशी माहीती रोजगार उपलब्धतेच्या संदर्भात उपमूख्यमंञी अजित पवार यांनी दिली.
राज्यभरात टिकाऊ रस्ते व्हावेत म्हणून ते डांबरी ऐवजी काँक्रिटचे करण्याचे प्रयत्न - उपमूख्यमंञी अजित पवार
राज्यातील महत्वाच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी प्रकल्प संनियंत्रण समिती केली असून त्या माध्यमातून मेट्रो, रिंग रोड, मोठी रुग्णालये, बंदरे, समुद्र किनारी मार्ग आदी विविध विषयांच्या प्रकल्पांचा आढावा देऊन त्यांना गती दिली जात आहे.
राज्यभरात टिकाऊ रस्ते व्हावेत म्हणून ते डांबरी ऐवजी काँक्रिटचे करण्याचे प्रयत्न आहेत, असे उपमूख्यमंञी अजित पवार यांनी सांगितले. "Saman Pani Purwatha Yojana"
तूम्हाला ही बातमी आवाडली असेल अशी आशा करतो धन्यवाद.
0 Comments