राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांच्या वेळेमध्ये होणार बदल राज्य शासनाचा निर्णय Change in School Hours

Change in School Hours
Change in School Hours 

Change in School Hours महाराष्ट्र राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांच्या वेळेमध्ये बदल करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून यानुसार शाळांच्या सकाळच्या सञाच्या वेळेमध्ये बदल होणार आहे.

राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांच्या वेळेमध्ये होणार बदल

महाराष्ट्र राज्यामध्ये माननीय राज्यपाल साहेब यांच्या सूचनेनुसार राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांच्या वेळेमध्ये बदल करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. 

आता राज्यातील शाळांच्या सकाळच्या सत्रातील वेळेमध्ये बदल होणार आहे. यानुसार राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथी पर्यंतचे वर्ग सकाळी नऊ किंवा नऊ वाजेनंतर भरवण्याबाबत राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शासन निर्णय (GR) दिनांक 8 फेब्रुवारी 2024 रोजी निर्गमित केला आहे.

सकाळच्या सत्रातील शाळांच्या वेळेबाबत विचार करण्याची मा.राज्यपाल महोदय यांनी केली होती सूचना

शालेय शिक्षण व क्रीडा विभागा मार्फत सहा प्रोत्साहनात्मक योजनांचा शुभारंभ करण्यासाठी राजभवन मूंबई येथे दिनांक 5 डिसेंबर 2023 रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाषणा दरम्यान माननीय राज्यपाल महोदय यांनी शालेय शिक्षण विभागाला सकाळच्या सत्रातील शाळांच्या वेळे बाबत विचार करण्या बाबत सूचना केली होती.

त्यानुसार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे या कार्यालय मार्फत राज्यातील विविध शाळांच्या वेळा विचारात घेऊन शाळांची वेळ बदलण्या विषयी अभ्यास करण्यात आला. Change in School Hours

सदर अभ्यास करण्यासाठी राज्यातील शिक्षण तज्ञ, शिक्षण प्रेमी, पालक, तसेच प्रशासनातील अधिकारी यांचे देखील अभिप्राय नोंदवण्यासाठी गुगल लिंक उपलब्ध करून देण्यात आली होती. गुगल लिंक वरील अभिप्राय व विविध शिक्षण तज्ञ व शिक्षण प्रेमी व पालक यांच्याशी चर्चा केली असता प्राधान्याने खालील महत्त्वाच्या बाबी समोर आल्या आहेत.

१) राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळापैकी काही शाळा विशेषतः खाजगी शाळा भरण्याच्या वेळा या साधारणपणे सकाळी सात नंतर असल्याचे दिसून येते. 

2) आधुनिक युगातील बदललेली जीवनशैली, मनोरंजनाची विविध साधने, शहरातील उशिरापर्यंत सुरू असलेले ध्वनी प्रदूषण, उदा. वाहनाचा आवाज, विविध कार्यक्रमाच्या अनुषंगाने वाजविले जाणारे कर्कश संगीत, इत्यादी. अशा अनेक विविध कारणांमुळे विद्यार्थी रात्री उशिराने झोपत आहेत व सकाळी लवकर शाळा असल्याने त्यांची झोप पूर्ण होत नाही ज्याचा नकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्यावर होताना दिसत आहे. 

३) पालकांच्या मते पाल्यांची झोप ही सकाळी पूर्ण न झाल्याने शाळेत जाण्यास लवकर उठण्यासाठी तयार नसतात. 

४) सकाळी लवकर शाळा असल्याने विद्यार्थ्यांची रात्रीची झोप पूर्ण होत नसल्याने ते दिवसभर आळसलेले दिसून येतात त्यामुळे बऱ्याचदा अध्ययनासाठी आवश्यक असणारा उत्साह कमी असलेला दिसून येतो ज्याचा नकारात्मक परिणाम त्यांच्या अध्ययनावर होतो. 

५) मोसमी हवामान विशेषतः हिवाळा व पावसाळा या ऋतूमध्ये सकाळी लवकर उठून शाळेत जाणे पावसामुळे थंडीमुळे अनेक विद्यार्थ्यांना त्रास होतो ते बहुदा आजारी पडतात. 

६) सकाळी पाल्याला लवकर तयार करणे, जेवणाचा डबा तयार करणे, आणि पाल्याला वेळेत शाळेत सोडणे यामुळे देखील अनेक पालकांची ओढाताण होते. 

७) सकाळी लवकर भरणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांना बस व व्हॅनद्वारे नेतांना रस्त्यावरील धूके, पावसामुळे अडचणी निर्माण होतात. 

८) त्यानुसार शाळेच्या वेळेत बदल करताना शहरातील शासकीय, निमशासकीय कार्यालयाच्या वेळा व शाळांच्या वेळा समांतर येणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे. अन्यथा शहरी भागात वाहतुकीच्या मोठ्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.

९) यानुसार शाळांच्या वेळेत बदल करताना दोन सत्रांमध्ये भरणाऱ्या शाळांनी नियोजन करताना किमान प्राथमिक स्तरावरील  विद्यार्थ्यांसाठी दुसऱ्या सञाचा विचार करावा.

उपरोक्त परिस्थितीचा विचार करता सकाळी नऊ पूर्वी भरणाऱ्या राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्वप्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग भरविण्याच्या वेळात बदल करणे आवश्यक होते. 

यासाठी स्थानिक परिस्थितीचा विचार करून सकाळी नऊ किंवा नऊ वाजेनंतर राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या पूर्वप्राथमिक ते इयत्ता चौथी पर्यंतचे वर्ग भरविण्या बाबत शासनाने खालील प्रमाणे सूचना निगर्मित केल्या आहेत.

अ) राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनांच्या ज्या शाळांची पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतचे वर्ग भरण्याची वेळ सकाळी नऊ वाजेच्या अगोदर आहे त्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथी पर्यंतचे वर्ग भरविण्याची वेळ सकाळी नऊ किंवा नऊ नंतर ठेवावी. 

ब) शाळेच्या वेळात बदल करताना बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा 2009 नुसार शालेय शिक्षणासाठी अध्ययन, अध्यापनाच्या निश्चित केलेल्या कालावधीत कोणतीही बाधा येणार नाही याची दक्षता संबंधित शाळा व्यवस्थापनाने घ्यावी. 

क) ज्या शाळेच्या व्यवस्थापनांना आपल्या शाळेची वेळ बदलणे अगदीच शक्य होत नसेल त्यांच्या अडचणी प्रकरण परत्वे संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी / शिक्षण निरीक्षक प्राथमिक यांनी मार्गदर्शन देऊन सोडविण्याची तजविज करावी यासाठी संबंधित शाळेच्या व्यवस्थापनाने आपल्या जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी / शिक्षण निरीक्षक प्राथमिक यांच्याशी संपर्क साधून प्रकरण परत्वे मार्गदर्शन घेऊन कार्यवाही करावी.

या वरील सर्व सूचनांचे पालन राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळा करतील याबाबतची दक्षता शिक्षण संचालक प्राथमिक यांनी घ्यावी असे निर्देश राज्य शासनाने दिले आहे

अशा प्रकारे वरील मार्गदर्शक सूचनानुसार शाळेतील वेळामध्ये बदल होणार आहे. "Change in School Hours"

शासन निर्णय (GR) डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

तूम्हाला हा लेख आवडला असेल अशी आशा करतो धन्यवाद.

Post a Comment

0 Comments