फळपिक विमा भरून शेतकऱ्यांनी फळपिक विमा योजनेचा लाभ घ्यावा कृषिमंञी धनंजय मूंडे यांचे आवाहन.

Crop insurance प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना सन 2024-25 व 2025-26 या दोन वर्षात राबवण्यासंदर्भात राज्य शासनाने मान्यता दिली आहे त्यानूसार राज्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा भरून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषीमंञी यांनी केले आहे.

शेतकऱ्यांनी फळपिक विमा भरावा - कृषीमंञी.

प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना सन 2024-25 व 2025-26 या दोन वर्षात राबवण्यासंदर्भात राज्य शासनाने मान्यता दिली असुन मृग बहार व आंबिया बहारातील ठराविक फळ पिकांचा विमा शेतकरी बांधवांनी भरून या योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन राज्याच्या कृषी विभागाने व कृषीमंञी धनंजय मूंडे यांनी केले आहे. Crop insurance

या हंगामात राज्यात डाळिंब, संत्रा, मोसंबी, चिकू, पेरू, लिंबू, सीताफळ, द्राक्ष, आंबा, पपई, काजू, स्ट्रॉबेरी व द्राक्ष (क) इत्यादी पिकांचा फळपीक विमा योजनेत सहभाग करण्यात आला आहे.
मृग बहरात द्राक्ष (क), संत्रा, पेरू, लिंबू या चार पिकांसाठी विमा भरण्याची अंतिम मुदत 25 जून निश्चित करण्यात आली आहे; त्याचबरोबर मोसंबी चिकू 30 जून, डाळिंब 14 जुलै तर सीताफळ पिकासाठी 31 जुलै ही मुदत देण्यात आली आहे. 
सर्व शेतकरी बांधवांनी वेळेत आपल्या फळ पिकांचा विमा भरून घ्यावा असे आवाहन कृषीमंञी धनंजय मूंडे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments